Hot Posts

6/recent/ticker-posts

जय भवानी तरुण मंडळ मोहन नगर च्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..

 

      चिंचवड दि.२४-:  जय भवानी तरुण मंडळ मोहननगर चिंचवड यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोहननगर येथील शिवपार्वती कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात यावेळी मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, उद्योजक लक्ष्मण म्हेत्रे, सागर धुमाळ, गणेश दातीर पाटील, राजेंद्र घावटे,कमलेश लुकंड, सयाजी भांदिगिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


     कार्यक्रमाचे संयोजक मारुती भापकर यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले, भावी जीवनात यशस्वी होण्याच्या सदिच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आय ए एस,आय पी एस, डॉक्टर,इंजिनियर होण्याचे उच्चतम लक्ष साध्य करण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे असाध्य ते साध्य,करवीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे! हा तुकाराम महाराजांचा संदेश कायम लक्षात ठेवून आपल्या पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आपली वाटचाल ठेवावी.असे आवाहन भापकर यांनी व्यक्त केल्या.


              

       इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एसएससी बोर्डाचे माजी सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गुणवत्ता आपले स्वतःचा आनंद आणि त्यानुसार करिअर याबाबत मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांना सांभाळण्याबाबत त्यांना सहकार्य करण्याबाबत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबाबत आव्हान केले. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हा एक कोहिनूर हिरा असतो त्यामध्ये एक गुण सर्वोत्तम असतो त्या गुणाला शोधून त्याला पैलू पाडले तर त्याचे आयुष्य आनंदी होते आणि आनंदी आयुष्य म्हणजेच आपले करिअर या दृष्टीने पालक विद्यार्थी यांनी आपली दहावी नंतरची शाखा निवडणे आवश्यक आहे तसेच दहावीला मिळालेला मार्क्स किंवा बारावीचा निकाल याकडे सकारात्मकपणे पाहणे आवश्यक आहे निकाल समजून घ्या त्याच्यावरती विचार करा मुलांच्या आजपर्यंतच्या आवडीच्या गुणांची यादी करा आणि त्यानुसार पुढील शाखा निवडा असे मत श्री गुंजाळ यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमात दहावी बारावी सह उत्तम पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

       या कार्यक्रमाची आयोजन मा. नगरसेवक मारुती भापकर यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रणाली नवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी दिगंबर बालुरे, सतीश शर्मा, शिवाजी गोणते, विशाल भालेराव, पप्पू दाभोळे, दत्ता वाघमोडे, नाना खरात,सतीश चव्हाण, डिप्यु भोसले, आदेश लुकंड आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments