पुसद -:(तालूका प्रतिनिधी) नि:संशय छत्रपती शिवाजी महाराज धर्माने हिंदू होते,परंतु त्यांच्या राज्यात इतर धर्मीयांना हिंदू इतकेच संरक्षण होते.जातीवरून वा धर्मावरून भेदभाव केल्या जात नसे, तसेच स्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करण्यात येत असे. आधुनिक काळात रूढ झालेले धर्मनिरपेक्षतेचे तत्व छत्रपतीने हिंदवी स्वराज्यात १७ व्या शतकात रूढ केले होते. छत्रपतीनी स्थापन केलेले राज्य हे रयतेचे राज्य होते.' अशा आशयाचे उद्गार अकोल्याचे लेखक,विचारवंत प्रा.डाॕ.एम.आर.इंगळे यांनी चार्वाकवनातील शिवजयंती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी से.नि.आयुक्त (म.रा.)मा.संभाजीराव सरकुंडे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून आयु.आनंद भगत, यवतमाळ,आयु.किरण पळसपगार ,अकोला,आयु.उद्धवराव भालेराव,आर्णी आणि श्री नारायणराव क्षीरसागर, पुसद हे उपस्थित होते.
वटफळी ता.नेर येथे दरवर्षी दि.२ आणि ३ फेब्रुवारीला रामजी सुभेदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धम्मपरिषदचे आयोजन करण्यात येते आणि तीत धम्मकार्य करणाऱ्यांना धम्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुसद येथील प्रा.डाॕ.अनिता कांबळे,आयुष्यमती शांताबाई लोखंडे आणि आयु.सुरेश कांबळे यांना धम्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांच्या हस्ते करण्यात आला.आयु.उद्धवराव भालेराव,किरण पवसपगार यांची समयोचित भाषणे झाली.सत्कारमूर्ती प्रा.डाॕ.अनिता कांबळे आणि आयु.सुरेश कांबळे यांनी सत्काराला उत्तर दिले.
शिवजयंतीच्या पर्वावर चार्वाकवन व्यवस्थापनातर्फे ' शिवपत्र' हे अनियतकालिक प्रकाशित करण्यात येते.सन. २०२५ च्या शिवपत्राचे विमोचन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहूणे यांचे हस्ते करण्यात आले.
संविधान घर योजनेचे आधारस्तंभ आणि संविधान सन्मान पुरस्कार(कोल्हापूर) प्राप्त उपा.भीमराव भवरे,मोहदी यांचे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. प्रमुख पाहूण्याच्या भाषणापूर्वी स्मृतीशेष भीमराव भवरे यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आष्टा ता.किनवट जि.नांदेड येथील आयु.आनंद संदीपन खरे यांनी शिवगीत सादर केले.
संचलन आयु.रमाकांत मामीडवार यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अॕड.अप्पाराव मैन्द यांनी केले.
0 Comments