सोहळ्यात महाप्रसाद, पालखी मिरवणूक, स्वामी सेवा, भजन, नामस्मरण, आणि कीर्तन यांसारख्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. विशेषतः स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका मिरवणूक, जी पूर्ण संत नगर परिसरतून काढण्यात आली, ती अत्यंत आकर्षक आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली होती. स्वामींच्या पादुकांच्या मिरवणुकीला हजारो भक्तांनी हजेरी लावली आणि पालखीच्या मागे नाचत, गात, जयजयकार करत आले. या मिरवणुकीला संत नगरच्या प्रत्येक गल्लीत, वळणावर, आणि चौकात एक विशिष्ट भक्तिरसाची लहर पसरली.
पालखीच्या मागे श्रद्धाळु, संप्रदाय आणि सेवा भावाने एकत्र येऊन, भक्तिमय वातावरण निर्माण करत होते. यामुळे मिरवणूक केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती त्या परिसरातील एक आदर्श धार्मिक आणि सामाजिक सोहळा बनला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पंकजभाऊ शिवाजी पवार आणि सर्व सेवेकरी यांनी अतिशय मेहनत घेतली. त्यांच्या समर्पणामुळेच हा भक्तिरसाचा सोहळा अधिक भव्य आणि मंगलमय झाला.
0 Comments