Hot Posts

6/recent/ticker-posts

जळगाव पाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी,कर्मचारी मुख्यालया ऐवजी जळगावत राहतात.

 

       यावल दि.२४-: पाटबंधारे विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील उपविभागीय अभियंता,उपविभागीय अधिकारी, आणि शाखा अभियंते यांच्यापैकी अनेक अधिकारी कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहता जळगाव येथेच कार्यालयात आणि शहरात उपस्थित राहत असल्याने आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात येत नसल्याने जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ता तसा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी गेल्या ३ महिन्यापूर्वी जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.दिलेल्या तक्रार अर्ज नमूद करण्यात आले आहे की जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील उपविभागीय अभियंता,उपविभागीय अधिकारी, आणि अभियंता महिन्यातून १५ ते २० दिवस कायम जळगाव विभागीय कार्यालयात शासकीय कामाच्या निमित्ताने कार्यरत असतात त्यामुळे त्यांचे नियुक्तीचे ठिकाण म्हणजे जिल्ह्यातील उपविभाग शाखा कार्यालयात ते कार्यालयीन वेळेत उपस्थित आढळून येत नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयात एखाद्या वेळेस संबंधित शिपाई किंवा लिपिक उपस्थित असल्याने त्यांना विचारणा केली असता साहेब साइडवर गेले आहे, जळगावला मिटींग आहे इत्यादी  कारणे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. काहींनी तर कागदोपत्री मुख्यालय राहण्याची खोटे आणि बोगस पुरावे आपल्या वरिष्ठांकडे दिले आहे. पर्यायी शेती कामामुळे शेतकऱ्यांना जळगाव येथील जळगाव पाटबंधारे विभाग कार्यालयात जाता येत नाही त्यामुळे उपविभागीय अधिकारी शाखा अभियंते हे मुख्यालयाच्या

      ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांनी द्यायला पाहिजे तसेच जे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नाही ते कोणत्या नियमाने घरभाडे ( HRA ) भत्ता घेतात..? तसेच संबंधित मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसून जळगाव येथे राहत असल्यामुळे त्यांनी भाडे कराराने लावण्यात आलेले खाजगी वाहनांचा अनावश्यक वापर होत आहे तसेच या खाजगी भाडे कराराच्या वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिलेले स्टिकर लावून टोल टॅक्स चुकविला जात आहे.शासकीय नियमानुसार खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन स्टिकर लावता येत नाही तरी संबंधित अधिकारी हे शासनाची दिशाभूल करीत असून जळगाव येथे राहत असल्याने त्यांना प्रवास भत्ते इत्यादी बिल मिळत असल्याने त्यात मोठा भ्रष्टाचार गैरप्रकार होत आहे त्यामुळे याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नितीन सुरेश रंधे यांनी केली आहे,निवेदनाच्या प्रती तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव मुख्य अभियंता तसेच लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव अधीक्षक अभियंता यांच्याकडे देण्यात आले असून संबंधित अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधित असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments